या नंतर अंकुशधारी महाराजांचे शिष्य श्री गाणेशवरिष्ठगाणपत श्रीमद हेरंबराज महाराज यांनी या योगीन्द्रमठाचे कार्य चालविले. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षीच आपल्या घराचा त्याग करून अखंड गुरुसेवेला वाहून घेतले. आदर्श गुरुसेवा कशी असावी याचा आदर्श साधकांसामोर ठेवला. कठोर तपश्चर्येने गणेशाला प्रसन्न करून घेऊन मठात राहून अंकुश मासिक पन्नास वर्षे चालविले व गणेशभक्तीचा प्रसार केला.
यांचा अवतार काळ – श्रावण शु. ७ शके १८१४ (इ. स. १८९२)
समाधी काळ – पौष शु. १ शके १८९६ (इ. स. १९७४)